विदर्भात शेतक-यांच्या आत्महत्या होत्त आहेत. आत्महत्येला कारणीभूत ठरणारी त्याची एकंदर आर्थिक स्थिती,सावकारांचा तगादा व त्याच्या घरातील परिस्थिती विषद करणारी ही छोटीसी काव्य पुष्टी.
भिंतीच्या उलगडल्या रेघा
लई दिस झाले, नाही मारला चुना
पावसाचं आड्यातुन गळते पाणी
लई दिस झाले, नाही फ़ेरलं आडं
आंगणातली चुरमडली तुळसी
झडले सारे पानं
शेतातलं पीक सारं
गेलं करपून
सांजेचा दिवा जळते कहिभहि
फ़ोडणीलेच तेल आता सापडत नाही
मिरगाचे दिस आले शेतीत टाकाचा दाणा
पैशाले तं भहीन! सावकार चाले उताणा
कसे दिसं पाह्यले,आता येते लळू
बुढी बी राहून लळते मुळुमुळु
बळीराजाले पाहा कसे दिसं आले
मायबाप सरकार काय करते मंबईले?
राघोबा तं गेला,आता माही कां बा वाट?
बळीराजाचा कां आता ? असाच परिपाठ ?
भिंतीच्या उलगडल्या रेघा
लई दिस झाले, नाही मारला चुना
पावसाचं आड्यातुन गळते पाणी
लई दिस झाले, नाही फ़ेरलं आडं
आंगणातली चुरमडली तुळसी
झडले सारे पानं
शेतातलं पीक सारं
गेलं करपून
सांजेचा दिवा जळते कहिभहि
फ़ोडणीलेच तेल आता सापडत नाही
मिरगाचे दिस आले शेतीत टाकाचा दाणा
पैशाले तं भहीन! सावकार चाले उताणा
कसे दिसं पाह्यले,आता येते लळू
बुढी बी राहून लळते मुळुमुळु
बळीराजाले पाहा कसे दिसं आले
मायबाप सरकार काय करते मंबईले?
राघोबा तं गेला,आता माही कां बा वाट?
बळीराजाचा कां आता ? असाच परिपाठ ?
0 comments:
Post a Comment